Pravachan 24-01-2013 on "AMBADNYA"
Hariom Pravachan 24/01/2013
श्रीस्वस्तिक्षेम संवाद आधी साधायचा आहे. आज आपल्याला नेहमीचाच प्रवास करताना थोडसं एक विश्रांतीचं, अभ्यासाचं स्थान घ्यायचं आहे. थोडासा अभ्यास करायचा आहे. आपण उपनिषदामध्ये ‘अंबज्ञ’ शद्ब वाचला. हा कुठल्या व्याकरणातून बनलेला शद्ब नाही. ती माता ‘दत्तज्ञ’ आहे, ती कृतज्ञ आहे, तसा हा परमात्मा ‘अंबज्ञ’ आहे, आईच्या चरणी कृतज्ञ म्हणजे ‘अंबज्ञ’ आहे.
॥ हरि ॐ ॥
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०१.२०१३)
॥ हरि ॐ॥
श्रीस्वस्तिक्षेम संवाद आधी साधायचा आहे. आज आपल्याला नेहमीचाच प्रवास करताना थोडसं एक विश्रांतीचं, अभ्यासाचं स्थान घ्यायचं आहे. थोडासा अभ्यास करायचा आहे. आपण उपनिषदामध्ये ‘अंबज्ञ’ शद्ब वाचला. हा कुठल्या व्याकरणातून बनलेला शद्ब नाही. ती माता ‘दत्तज्ञ’ आहे, ती कृतज्ञ आहे, तसा हा परमात्मा ‘अंबज्ञ’ आहे, आईच्या चरणी कृतज्ञ म्हणजे ‘अंबज्ञ’ आहे.
आपली कोणी स्तुती केली की आपण ‘श्रीराम’ म्हणतो Thanks ऐवजी ‘अंबज्ञ’ म्हटलं तर ज्याला म्हणतो त्याचा आणि आपलाही फायदा आहे. हा शद्ब आपल्या रोजच्या वापरात यायला हवा. प्रसन्नोत्सवाच्या तयारीच्या वेळी आपण ‘विच्चै’ शद्ब बघितला. ‘विच्चै’ क्रियापद नाहीए, अव्यय आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. जो शद्ब कर्त्याच्या काळानुसार, लिंगानुसार रूप बदलत नाही. ज्याचा व्यय होत नाही ते अव्यय. हा शद्ब कुठल्या ही मंत्रात येऊ शकत नाही, कारण हा सिद्ध केलेला आहे. देवासाठी भक्त जे-जे करू इच्छितो ते सगळं विच्चैकारातून येतं. विच्चैकाराचा गजर आपण गुरुक्षेत्रम् मंत्रामधून केल्यावर आपल्याला ‘अंबज्ञ’ शद्ब प्राप्त झालाय. आपल्या शरीर, मन, बुद्धी, प्राण, आजूबाजूच्या वातावरणाला सगळ्याला उचित ठेवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं ह्यात आहे. ह्या शद्बात कृतज्ञता आहे.
आपल्यासाठी जे जे घडायला पाहिजे ते घडवून आणणारी यंत्रणा या शद्बात आहे. एकच मशिन जे एकाच वेळी एका ठिकाणी गरमही करते आणि गारही करते. जे त्याक्षणाला आवश्यक आहे तसं करते. आवश्यकतेनुसार जे जे उचित आहे त्यानुसार सगळं काही राबवणारी यंत्रणा ह्यात आहे. दोन्ही टोकाच्या गोष्टी एकाच वेळेस वापरून जीवनात balance साधला जाणार कसा? हे बघणं आमचं काम नाही, ‘तिचं’ काम आहे. जसा वर्षात उन्हाळा आहे तसा पावसाळा, हिवाळा पण आहे हे योग्य राखायचं काम निसर्ग करतो.
माणसाला दोन कान, दोन डोळे, जीभ मात्र एकच दिली. बोलण्यापेक्षा ऐकण्याचे काम जास्त करा किंवा बोलतो त्याच्या दुप्पट ऐकलं पाहिजे ही देवाची इच्छा असणार ह्याचा विचार आपण करतो का?
दोन डोळे, दोन कान दिलेत. प्रत्येक गोष्ट जी आपण ऐकतो त्याची दुसरी बाजू असते हे आपल्याला कळलं पाहिजे. नाण्याला दुसरी बाजू असते. नुसतं बघून, ऐकून विश्वासू नका. आम्ही ऐकतो .... अमुक अमुक स्कीममध्ये तीन महिन्यात पैसे दुप्पट होतात. आपण हुरळून जातो आणि तोंडघशी पडतो. कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. डोळ्यांनी तुम्हाला तेच दिसतं जे तुम्हाला दाखवलं जातं. जे मनातल्या मनात बोललं जातं ते तुम्हाला ऐकू येतं का? आपण जे दिसतं त्याला react करतो. पण पुढे वेगळीच गोष्ट घडायची असते, पण ते सामान्य माणसाला कळणारं नसतं. अशावेळी तो परमात्मा मदतीला येतो. ‘अंबज्ञ’ ह्या शद्बातच अशी सिद्धी आहे की, आपली कृतज्ञता मातेच्या चरणांपर्यंत पोहोचवते.
१०८ वेळा मंत्र म्हणून म्हटलं तरी त्याचा उपयोग होईल, पण त्यापेक्षा हा शद्ब जीवनात फीट केलात, जीवनात ‘अंबज्ञ’ बनलात तर जास्त चांगलं होईल. सकाळी उठल्यावर म्हणा - ‘अंबज्ञ’ , सकाळी पोट साफ झाल्यावर म्हणा ‘अंबज्ञ’ , रात्री झोपताना म्हणा - आमचा दिवस नीट गेला ‘अंबज्ञ’, जेवण जेवायच्या आधी, जेवण झाल्यावर म्हणा, ऑफिसमधून घरी गेल्यावर म्हणा, घरून ऑफिससाठी निघताना म्हणा, वस्तू विकत घेतली की म्हणा, पगाराचं पाकीट मिळालं की म्हणा. आपोआप ‘अंबज्ञ’ यायला हवं. ‘अंबज्ञ’ शब्द मनांत रुजू होऊ देत.
धडा वाचून झाला, गणितातली difficulty सुटली की म्हणा, रिझल्ट घेताना, परीक्षेचा पेपर घेताना म्हणा. ‘अंबज्ञ’ आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू देत. कोणी तुमची चूक नसतांना तुमच्यावर दोषारोप केलेत, तुम्हाला शिव्या घातल्या तरी ‘अंबज्ञ’ म्हणा, ते दोषारोप आईच्या चरणी अर्पण होतील. आपलं जीवन ‘अंबज्ञ’ झालं पाहीजे.
मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल, नुसतं ‘अंबज्ञ’ म्हटलं तरी चालेल. अशी साधी गोष्ट जरी जीवनात बाळगली तरी संपूर्ण जीवन ‘अंबज्ञ’ बनेल. अगदी नुसतं mechanically जरी कोणी हा शद्ब उच्चारला तरी ते त्याचं काम करणारच, त्या व्यक्तीचंही भलं होणार.
‘अंबज्ञ’ शद्बाचं ओझं बनता कामा नये. "अरे, मी अंबज्ञ म्हणायला विसरलो" असं ओझं बाळगू नका. आम्ही विसरलो तरी, आई, बापू आमच्यावर रागवणार नाहीत. त्याचं कर्तेपण स्वत:कडे घेऊ नका - "मी इतके दिवस इतक्यांदा मंत्र म्हणतोय आज विसरलो." तुमचा मी मध्ये येऊ देऊ नका. ‘अंबज्ञ’ हा शद्ब तिचा मुलगा आमच्याकडून म्हणवून घेतोय. त्याला पाहिजे तेवढ्या वेळा तो म्हणवून घेईल. तिच्या इच्छेने तो म्हणवून घेतोय, कारण तिच्या लेकाने तो आम्हाला दिलाय. अतिशय प्रेमाने, शांतीने म्हणा. त्याची गिनती, मोजमाप, वजन करू नका. उदी लावताना ‘अंबज्ञ’ म्हणा. ‘अंबज्ञ’ सगळ्यात बेस्ट आहे. कारण त्यात माझा संकल्प आहे.
‘साईज्ञ’ म्हणा, ‘अंबज्ञ’ म्हणा पण कुठल्याही माणसाच्या नावासमोर ‘ज्ञ’ जोडू नका. सख्खे आई-वडील असले तरी ते देवासारखे आहेत पण देव नाहीत. एखाद्याच नाव दीपक आहे, त्याला thanks म्हणायचे आहे तर तिथे दीपकज्ञ म्हणू नका.
जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा ‘अंबज्ञ’ म्हणा, आजूबाजूला शंभर माणसं असली तरी एकटं वाटू शकतं. एकटेपणा मानसिक आहे, ऐहिक आहे - जेव्हा ‘अंबज्ञ’ म्हणाल, त्याच क्षणाला तुमचं एकटेपण संपलेलं असेल. कधीच स्वत:ला एकटं समजू नका. त्या क्षणाला तुम्ही एकटे नसणारच. १०० टक्के. माझा गुरु माझ्याबरोबर आहेच.
रस्त्यावरून जाताना एखादा accident पाहिलात, वाईट गोष्ट बघितली तरी ‘अंबज्ञ’ म्हणा का? तर ही वाईट गोष्ट आमच्या जीवनात घडली नाही म्हणून. ज्याच्या जीवनात ती घडतेय तो तुमच्या धर्माचा नसला तरी, तुम्हाला ओळखत नसला तरीसुद्धा त्याला ह्या ‘अंबज्ञ’ चा फायदा होईल आणि आम्हाला एका असहाय्य माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल.
परीक्षेत नापास झालात, आपल्या मनाविरुद्ध घडलं, अपयश मिळालं तरी ‘अंबज्ञ’ म्हणा. मनाविरुद्ध घडलेली गोष्टसुद्धा फायद्याची ठरेल. ह्या शद्बाचा प्रवास नीट चालला पाहिजे.
दरवर्षी वर्षाच्या शेवटी किंवा सुरुवातीला आपण गेल्यावर्षी काय काय करायचं ठरवलं होतं? किती गोष्टी पूर्ण झाल्या? किती झाल्या नाहीत. ह्याचा रेकॉर्ड ठेवा चांगलं असतं. त्यामुळे कळतं आपण काय-काय करू शकलो नाहीत.
दरवर्षी त्याच-त्याच गोष्टी आपण ठरवतो, ज्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्या राहून जातात. रोज सकाळी उठल्यावर म्हणा -"मी ही गोष्ट करणार आहे अंबज्ञ" गोष्ट चांगली असेल तरं आपोआप घडू लागेल. करायची राहून गेली तरी रात्री म्हणा - "मी ही गोष्ट आज केली नाही अंबज्ञ."
प्रत्येकाने आपल्याच मनाला प्रश्न विचारा की, "खरंच मी अंबज्ञ आहे का?" प्रत्येकाने त्याचं उत्तर ‘हो’ च द्यायचं. काही वेळा वाटेल मी अंबज्ञ नाही असे वाटलं तरी ती गोष्ट नाकारायची. कारण जी व्यक्ती ‘अंबज्ञ’ शद्ब उच्चारते ती त्याक्षणी अंबज्ञच असते. आम्ही कसेही असलो तरी, ह्या शद्बाचा जेव्हा उच्चार करतो, तेव्हा त्याक्षणी आम्ही तसेच असतो. दिवसातून तुम्ही जितक्यांदा म्हणाल तितक्यांदा तुम्ही अंबज्ञच असता. हे कोणीही नाकारू शकत नाही कारण ह्यात माझा संकल्प आहे. त्यामुळे आता आम्ही कसे सुधारणार हा प्रश्न संपला. माझ्यात, माझ्या परिस्थितीत चांगला बदल घडू शकतो, जे जे मला चांगलं मिळालं नाही ते मिळू शकतं त्यासाठी मला इतर कोणी डिग्री देण्याची आवश्यकता नाही. जो कोणी ‘अंबज्ञ’ शद्ब उच्चारतो तो त्याक्षणी ‘अंबज्ञ’ असतोच व असणारच हे आमच्या बापूंनी सांगितलं आहे. मी आईच्या चरणी कृतज्ञ असतो त्याक्षणी मी सुधारलेलाच आहे.
ह्या ‘अंबज्ञ’ शब्दाची ताकद खूप मोठी आहे. आजपासून आपण हा ‘अंबज्ञ’ शद्बाचा जागर (गजर नाही) ठेवणार आहोत. हा जीवनाचा भाग बनला पाहिजे. जप नाही बनला तरी, त्याची सहजता व्हायला हवी. हळुहळू ही गोष्ट अंगवळणी पडणारच. आम्हाला हे जमू शकतं. नवीन लग्न जमतं तेव्हा नवरा मुलगा वा मुलगी त्यापूर्वी एकमेकांना ओळखतही नसतात पण लगेच मनाने स्वीकारतात ना एकमेकांना आपला साथीदार म्हणून तितकं सोपं आहे हे.
जो ‘अंबज्ञ’ ह्या रस्त्याने प्रवास करणार आहे त्याच्या रस्त्यावर मैलाचे दगड, गावाची नावं सांगणारी पाटी नसणार, कारण ह्या रस्त्यावर प्रत्येक गांव तुमच्या ओळखीचं असेल, प्रत्येक वाहन तुम्हाला उपलब्ध असेल म्हणून ह्या रस्त्यावरून निर्घोरपणे चाला. ज्या सहजतेने आपण आपल्या घरात चालतो त्याच सहजतेने ‘अंबज्ञ’ शद्बाच्या सहाय्याने आपल्याला जीवनात वावरायचे आहे.
ह्यापुढे ह्या वर्धमान व्रतापासून २०२५ पर्यंत होणार्या व्रतांमध्ये व्रताच्या काळात जो मनापासून ‘अंबज्ञ’ शद्ब दररोज व्रत केल्यानंतर म्हणेल, त्या व्यक्तीचा प्रत्येक जन्म फक्त माझ्या बरोबरच होईल. त्याचा एकही जन्म माझ्याशिवाय होणार नाही. मी असाच त्यांच्यासोबत असणारच. समजा व्रत करताना एखाद दिवशी म्हणायला विसरलात, तरी ही काळजी करू नका. जेवढं म्हणाल तेवढं तुमच्यासाठी पुरेसे आहे.
२०१३ पासून मी सांगितले की, काळ कठीण जाणार आहे. ह्यामधून माझी बाळं सुखरूप जावीत म्हणून गेले तीन गुरुवार तुम्हांला जे काही दयायचे आहे ते दिले आहे. पुढच्या काळासाठी All The Best आणि Congratulation. All the best ह्यासाठी की तुम्ही योग्य प्रकारे ह्याचा वापर करावा आणि congratulation ह्यासाठी की, तुम्ही ह्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे आचरणात आणत आहात.
॥ हरि ॐ ॥
Comments
Post a Comment
Hariom