गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली कथा हरि ॐ " गुढीपाडवा " ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस . ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस. ज्या दिवसाची वाट पाहत, चौदावर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवनव्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस . प.पू. अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती. हरि ॐ ज्याक्षणाची वाटपहात सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांनी आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम ,माता सीता, लक्ष्मणासह ,सुग्रीव आणि समस्त वानार्सैनिकांसाहित परत आले होते. हनुमंत भक्तश्रेष्ठ भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहचले होते. राजमहालात पोहचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षे...