परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०८.२०१३)
॥हरि ॐ॥
आपण ह्या आदिमातेचे algorithms बघत आहोत. सध्या बघत आहोत त्रिविक्रम π. कुठलेही गणित science च्या विरोधात नसतं. आपल्याला त्यातूनच पुढे जायचंय आहे.
त्रिविक्रम = π
= Circumference
Diameter
= 22/7 dismeter
=3.142
आपण याला दशांशमान म्हणजेच Decimals म्हणतो. २२ ला सतत ७ ने भागत राहिले तर (non-stop) तर काय होते याचा अभ्यास भारतात साधारण २५००० वर्षांपूर्वी केला गेला आणि इंग्लिश्मध्ये २१ त्यांना जी उत्तरं मिळत गेली त्याने त्यांचा interest वाढत गेला. जगातल्या सर्वात उत्तम कॉम्प्युटरद्वारे आतापर्यंत scientists ने ५ ट्रिलियन्स पर्यंत आकडे शोधून काढले. ५,००,००,००,००,००.००=०० आज इथे फक्त ३६० आकडे लिहिले आहेत हा ratio कसला?
परिघाचा (Circumference)
(वर्तुळ) वर्तुळाला कोन ३६०(अंश), १२ महिन्याला तिथी = ३६० म्हणजेच कालचक्र सुद्धा ३६०.२२/७=३६० व्या digit मध्ये आकडा आहे ३६० व परत ० ने सुरुवात हे आपोआप घडले आहे म्हणजेच हा नक्कीच विलक्षण, अद्भुत, चमत्कारिक आकडा आहे. ह्या वर्तुळातच ही सगळ्यात मोठी रचना आहे. वर्तुळाच्या एका बिंदुपासून प्रवास सुरू केला की ३६० अंश झाल्यावर पुन्हा तोच बिंदू.
π =२२/७= परीघ / व्यास
म्हणून परीघ = π d = 3.142 X d
आजचे जग हे Nano Technology चे जग आहे Nano Technology आज आपण Nano म्हणजे काय X (-9). Nano हिस्सा (१०-९)
आपण जेव्हा म्हणतो infection झाले तेव्हा bacteria २०० Nanometer एवढा लहान असतो. Microscopic Surgery Needles एकदम सूक्ष्म असतात. Nano Technology ची सुरुवात 1941 ला झाली. त्यावेळी scientists ना जाणवले.
There is enough place at the bottom. हा सगळ्यात पहिला सिद्धान्त (concept) Scientist नीं मांडला. त्यातील एक आईनस्टाईन ही होता. सगळे गणितज्ञ आणि physicist त्यावर अभ्यास करायला सुरू केला. संशोधनाला सुरुवात झाली. नंतर पुढे लक्षात आलं की ATOM हा खूप मोठा आहे. ह्यातूनच Quantum Physics उदयाला आले. या Nano Technology चा विचार करताना आपल्याला AT0M मध्ये शिरायचंय, त्याचं Operation करायचंय, मग ATOM मध्ये शिरताना किती सूक्ष्म digits लागतील ह्यातून १००० वा Digit शोधून काढला गेला. (Nano म्हणजे छोटयातला छोटयातल्या छोटयातला छोटा घटक.) ATOM च बदलायचा विचार चालू झाला आहे. ह्या दृष्टीने अनेक प्रयोग सुरू आहेत.
एक गोष्ट आठवते. एका माणसाला घाई होते. मला देव प्रसन्न व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी जातो. किती वर्षात देव प्रसन्न होईल. एक म्हणतो ‘१२ वर्षे’ तो म्हणतो ‘बाप रे!’, दुसरा म्हणतो ‘९ वर्षे’ तो म्हणतो ‘बाप रे!’, तिसरा म्हणतो ‘६ वर्षे’ तो म्हणतो ‘बाप रे!’,चौथा म्हणतो ‘१ वर्ष’ तो म्हणतो ‘मला तीन दिवसांत देव प्रसन्न व्हायला हवा.’ मग शेवटी एक म्हणतो ‘तीन मिनिटांत भूत प्रसन्न होईल.’ तो खूश होतो. भूत प्रसन्न झाले. म्हणाले, ‘तुझं सगळं काम करणार. पण एक अट आहे. काम नाही दिलंस तर तुला खाऊन टाकेन.’ तो पंचपक्वान्नाचं जेवण मागतो क्षणात जेवण तयार. मग घर मागतो. तो जेवून येईपर्यंत घर तयार. मागितली ती प्रत्येक गोष्ट क्षणात हजर. काय मागावं कळेना. मग तो भुताला सांगतो डोंगरावर चढ, खाली उतर असे करत रहा मी पुढचं काम सांगेपर्यंत आणि सुटका होते. तसचं computer ला वेडं करायचं असेल/बंद करायचं असेल तर computer ला सांगितलं की हे Division करत रहा. २२/७ चे ५ trilion पर्यंत divisions करायला जगातल्या सगळ्यात Best Computer ला आणि Scientists नां ४०० तास लागले. ही जी वाढती संख्या दिसते हा खेळ नाही. ही पवित्र संख्या आहे. कारण हा त्रिविक्रम आहे. ५-५ आकड्यांचा ३ रा सेट जर आपण पाहिला तर शेवटी (८९७९३) ३ आणि हे सर्व आकडे add केले तर त्याची बेरीज ९ (नऊ) येते. ९ वा आकडा सेट
६९३९९=९ बेरीज =९ (तीनदा ९ आकडा)
१८ वा आकडा सेट ३ ४ ८ २ ५ = २२
आदिशंकराचार्यांनी हा π कसा हे गणित मांडले. विश्वाची रहस्य यात उलगडली आहेत. ३६ वा सेट सुरुवात ० शेवट ९. ७२ वा सेट सुरुवात ९ शेवट ०.९ हा आकडा कधी येतो. ६७, ६८, ६९ अशा तीन क्रमाने येणार्या सेट वर ९ आकडा प्रथम क्रमांकावर येतो. नंतर ७२ व्या सेटवर पुन्हा येतो. पहिल्या ६६ आकड्यांमध्ये ५ आकडा एकदाही पहिल्या क्रमांकावर येत नाही.
६ ६ ६ ओमेन म्हणजे सैतान
६ ६ म्हणजे सैतानाचे कार्य
सैतानाच्या कार्याचा आकडा आणि ह्या आकड्यानंतर सलग तीनदा ९ आकडा येतो. म्हणजेच सैतानाच्या कार्याच्या आकड्यावर त्रिविक्रमाचा आकडा येतो. ९९९ म्हणजेच हा त्रिविक्रम किती मोठा आहे. म्हणजेच ६६ / अमर्याद आतापर्यंत ७ trillion पर्यंत खात्रीने शोध लागलाय.
६६/trillion म्हणजे सैतानाचा प्रभाव श्रद्धावानांच्या जीवनात अगदी नगण्य आहे. आम्ही आदिमातेचे खरेखुरे भक्त असू तर तो सैतान आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. कारण तो त्रिविक्रम कितीतरी पटीने मोठा आहे. सैतान किती लहान आहे आणि त्रिविक्रम किती मोठा आहे. ५० billion पर्यंत prove झालाय. ६६/१ trillion पंचक. म्हणजेच प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनात सैतानाचा प्रभाव ६६ व त्रिविक्रमाचा प्रभाव ५० billion. म्हणजेच आपल्या जीवनात सैतानाला शिरायलासुद्धा वाव नाही. म्हणून सांगतो गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणा. त्रिविक्रमनिलयं-श्रीगुरुक्षेत्रम् - ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे त्रिविक्रमनिलयं-श्रीगुरुक्षेत्रम्. तुम्ही तुमच्या अंतरंगात जे घर दिलंय, हा त्रिविक्रम राहतो कुठे? त्याला तुमचे प्रेमळ अंत:करण हवंय. तुमच्या हृदयाच्या प्रेमळ भागातच हा राहतो आणि तुमच्यासाठी गुरुक्षेत्रम्च आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण ऐकतो, बघतो, समजतो आणि आवडतेही तेव्हा ती गोष्ट आपल्या बुद्धीत स्थित होते. ही आकृतीबद्ध रचना आहे ज्यात सैतानाचा प्रभाव किती क्षुद्र आहे ते आपण पाहिले.
म्हणूनच गुरुक्षेत्रम् मंत्र म्हटला पाहिजे. आता ३६ नंबरचा सेट पाहूया.
०५५५९ (याचा संबंध शंकाराचार्यांचे स्तोत्र) १८ व्या सेटच्या शेवटी आपण ५ पाहिला ३६ व्या सेटच्या शेवटी नं ९ आहे. ५४ व्या पंचकात शेवटी ० आहे (४८ ४८) आणि ५२ वे पंचक ५६६९२ शेवटी २ आहे. हे नंबराचे सेट ५-५ चेच का असा प्रश्न कोणाला पडला का? कारण यातला प्रत्येक आकडा पंचमहाभूतांशी संलग्न आहे. आकाश, वायू, अग्नि, जल, पृथ्वी ही सृष्टी पंचमहाभूतांनी भरलेली आहे. म्हणूनच ५चा सेट ज्या प्रमाणात जगात या शक्ती कार्यरत असतात त्या प्रत्येक शक्ती ह्या पंचकांत अंतर्भूत होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक क्षणाला आपले मन किती बदलत असते. जगात जेवढे विचार आहेत त्या विचारांची प्रतिमा या पंचकात आहे. सर्व उर्जांची व विचारांची प्रतिमा या पंचकात आहे. जर चण्डिकाकुलावर श्रद्धा आहे, त्या त्रिविक्रमावर विश्वास आहे तर हे पाच आकडे तिकडे जोडण्याचे काम त्रिविक्रम करतो. जे जे चुकतं कृतींमध्ये, पदार्थांमध्ये ते ते योग्य प्रमाणात repair एकमेव ‘तो’ च करू शकतो. त्याच्याच सामर्थ्याखाली हे शक्य आहे. फक्त π त्रिविक्रमाचा प्रभाव तो स्वत: ही मेहनत प्रत्येकासाठी घेतो. जे श्रध्दाहीन आहेत त्यांच्यासाठी त्रिविक्रम कार्य करीत नाही.
वर्तुळाचे क्षेत्रफळ (area) हा जो area आहे त्या area चा चौरस बनविणे ही प्रक्रिया अतिशय कठीण आहे. ही कधीच जमली नाही. ती π या आकड्यामुळे जी जमली ती सुद्धा π आकड्यामुळेच.
वर्तुळ म्हणजे infinity अनंतत्व. चौकोन / चौरस म्हणजे limitedness मर्यादितपणा, क्षुद्रत्व. सैतान देवाला गुलाम बनवू इच्छितात. अनंतत्वाला मर्यादित बनवू पाहतात म्हणून ते वर्तुळाला चौकोन बनवू पाहतात. चौकोनाचे वर्तुळ होऊ शकतं पण वर्तुळाचे चौकोन होऊ शकत नाही. गुरुक्षेत्रम् मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हा विश्वास आमच्यात असलाच पाहिजे. त्या चण्डिकाकुलावर आपले प्रेम असलेच पाहिजे. ऋषी मानवाला अनंतत्व मिळावे म्हणून सहाय्य करीत असतात. Pyramids मध्ये त्यांनी circle चे चौकोन करायचा प्रयत्न केला पण त्या ममीज् (mummies) जिवंत झाल्या नाहीत.
आपल्याकडे सात चिरंजीव आहेत - १) परशुराम २) हनुमंत ३) बिभीषण ४) अश्वत्थामा ५) बली ६) व्यास ७) कृपाचार्य.
तुकाराम सदेह वैकुंठी गेले त्यांनी फक्त म्हटले ‘श्री हरि विठ्ठल!’ त्या विठ्ठलाने त्यांच्यासाठी गरुड पाठवला. त्यांना कुठला Pyramid बांधावा लागला नाही.
चौकोनाचा वर्तुळ करणं हे प्रत्येक सद्गुरुचं कार्य असतं. कितीही कुविद्या powerful असल्या तरीही हा π वर्तुळाचा चौकोन होऊच देणार नाही. श्रद्धावान कितीही चुकला, कसाही असला, चुकीची पंचकं निर्माण केली तरी तो सद्गुरु right panchak आमच्यासाठी पाठवतो-देत राहतो. हा आकडा कसा आहे. ३: कारण ही त्रिपुरसुंदरी, त्रिपुराम्बा, दत्तात्रेयांची तीन मुखे आहेत. बापू कुठून कुठे जातात.
मी (बापू) Mad आहे. प्रश्नच नाही.तुम्ही Mad व्हायचे की नाही ते तुम्ही ठरवायचे. जो इतिहास घडवला तो वेड्यांनीच. शहाणी माणसं जगात काही करू शकत नाहीत. वेडात मराठे वीर दौडले सात. सत्यवानासाठी सावित्री वेड्यासारखी यमाच्यापाठी धावली, सत्यवानाला परत घेऊन आली हे वेडेपण. वेडेपणा म्हणजे पागलपणा नव्हे. ह्या वेडेपणातच उत्कटता असते आणि उत्कटताच आम्हाला खरं यश मिळवून देते.
वेडेपणा म्हणजे संपूर्ण अंत:करणाने करण्याची क्रिया, मनापासून, जीव ओतून, whole heartedly. आज आपण पाहतो. लग्न करताना अनेक अटी असतात. घर पाहिजे, कुटुंब लहान हवं, सासू नको, दीर नको. अरे ज्याच्या बरोबर संसार करायचा ती व्यक्ती कशी आहे? ते बघाना. माझा स्वभाव कसा? परिस्थिती कशी? त्याला अनुकूल काय? ह्यानुसार बघणे आवश्यक आहे. निव्वळ शारीरिक आकर्षणाला अर्थ नाही. calculations नकोत.
सुंदर फुलाचा वास घ्यायला गणित लागतं का? घाणीचा वास घाणेरडाच येतो तेथे वेगळं गणित नसतं. आम्ही जीवनात प्रत्येक गोष्ट उत्कटतेने केली पाहिजे. मुलांवर प्रेम आम्ही असेच उत्कटतेने केले पाहिजे. मुलं प्रेम करत नाही असं म्हणता तर विचार करा आपण मुलांवर उत्कटतेने प्रेम करतो का? त्यांची उत्कटता जर कमी पडतेय तर त्यांची उत्कटता वाढवा. मुलं कितीही मोठी झाली तरी ही उत्कटता कमी होता नये. प्रेम हे देण्यासाठी असतं घेण्यासाठी नाही. प्रेमामध्ये फक्त प्रत्येक व्यक्ती द्यायला उत्सुक असते. जेव्हा अशा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा सगळं चांगलं होणारच. द्यायला शिका त्याने वाढतं. Whole Heartedly करा. पूर्वी बायका नवरा गेल्यावर ऊर बडवत रडायच्या. दु:ख आहेच पण over reaction कशाला? Show off नको. रडणं ही कृत्रिम आहे. Whole heartedly असेल तर अनेकदा अतीव दु:खाने डोळ्यांतून पाणी येतच नाही. अनुभवी व्यक्ती अशा वेळेस त्या व्यक्तीशी बोलतात व मन मोकळं करायला लावतात. तुमच्या प्रत्येक चुकीवरची हे पंचक म्हणजे त्रिविक्रमाची remedy च आहे. जर आम्ही त्याच्यावर खरंखुरं प्रेम करीत असू तर त्याच्याकडे remedies आहे.
देवी अथर्वशीर्ष मध्ये एक सुंदर श्लोक आहे. -
‘मंत्रानाम् मात्रुकादेवी । शद्बानाम् ज्ञानरुपिणी ।
ज्ञानानाम् चिन्मयातीता । शून्यानाम् शून्यसाक्षिणी ।’
मंत्रानाम् मात्रुकादेवी :
ही सगळ्या मंत्रांमध्ये मात्रुकारूपाने (मात्रा) आदिमाता विहार करीत असते.
शद्बानाम् ज्ञानरुपिणी :
शद्बांच्या पलीकडे जाऊन ती ज्ञान देते. ज्ञान अस्तित्वात आहे पण ती ज्ञानाला जिवंतपणा देते.
ज्ञानानाम् चिन्मयातीता :
ज्या काही सीमा आहेत त्यात ती चिन्मयातीता आहे. ज्ञानाचा जिवंतपणा ती आहे.
शून्यानाम् शून्यसाक्षिणी : शून्य म्हणजे काहीच नसणं. या शून्याची साक्षिणी तीच जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही ती होतीच. काही नाही अशी जी जाणते तीच एकमेव साक्षिणी. तीच ती अदितीरूपाने म्हणजेच अखंडित निर्गुणरूपात आहे.
असा हा π खेळतो आपल्या जीवनात मंत्रानाम् मात्रुकादेवी. मात्रुका किती आहेत. १६ स्वर ३३ व्यंजनं = ४९.
शुभ मंत्र कसा बनतो. मंत्र बनवून बनत नाही. तो त्या आदिमातेच्या प्रेमाने, तिच्या पुत्रांच्या चित्तातून उत्पन्न होतो. सगळे शुभ मंत्र हे चण्डिकापुत्रांच्या चित्तातूनच तयार होतात. जन्माला येतात. ती जी क्षमारूपाने सर्वांसाठी वावरते व तिचा पुत्र तिची क्षमा आमच्यापर्यंत पोहोचवतो. पुत्रांचे जे तिच्यावर प्रेम आहे आणि आपल्याप्रती अकारण कारुण्य त्यातूनच हे सगळे मंत्र जन्माला येतात. आदिशंकराचार्य म्हणजे शेवटचा वेद-व्यास. शंकराचार्यांनी त्या मंत्रांचे जयगान केले. संस्कृत भाषा जी आपण वाचतो व वेदांतील संस्कृत ही वेगळी वाटते. ती वेगळीच एक संस्कृतीची पातळी आहे. वैदिक संस्कृत : गीर्वाणभारती. त्याच्या आधीची देववाणी संध्याभाषा. संध्या दिवसातून दोनदा असतात. दोन मूळ शक्ती अग्नि व शोम् ह्यांच्या मिलनाची ही वेळ आहे (संध्याकाळ).
सूर्य (अग्नितत्व) व चंद्र (सोमतत्व) ह्यांचा मिलनाचा परफेक्ट balance म्हणजे हा संध्यासमय.
अग्निशक्ती + सोमशक्ती यांच्या मिलनाचा perfect balance = संध्यासमय.
संध्या = २. रात्र सरुन सूर्योदय होतो तेव्हा, दिवस सरुन सूर्यास्त होतो तेव्हा.
यावेळी अश्विनीकुमार येतात.
संध्याभाषा म्हणजे ज्यातील कुठलाही उच्चार चुकूच शकत नाही. प्रत्येक उच्चार समतोल Harmony,
balanced चूक होऊच शकत नाही. ही जी देववाणी आहे त्यात २२ स्वर आहेत. ही भाषा त्रिविक्रम बोलतो. मूळ मंत्रांचे २२ स्वर आहेत. मात्रांतून स्वर आणि स्वरांतून अक्षर. चण्डिकापुत्राची जी भाषा आहे ती देववाणी आहे. ‘कामप्रेविश्वदेवा: सभासद इति ।’ यात २२ स्वर आहेत. २२ स्वर आणि त्यातून निर्माण होणारे शद्ब आणि ज्ञानाच्या भूमिका ७ . जे उत्पन्न होते ते सामर्थ्य म्हणजेच २२/७ = π.
ज्ञानाच्या सात भूमिका, पावित्र्याचे सप्तश्लोक.
ज्ञानानाम् चिन्मयातीता : म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे जे काही उरते. जे शून्य आहे त्यातून उत्पन्न करण्याचं सामर्थ्य.
शून्यानाम् शून्यसाक्षिणीम् : अदिती - गायत्री - ॐकार हे सामर्थ्य = π आकडा ३.१४२.... Universe is continuously expanding असं विज्ञान म्हणतं. हे विश्वाचं सतत प्रसारित होणे म्हणजेच तो त्रिविक्रम (π) असा हा त्रिविक्रम व त्याची माता त्रिपुराम्बा.

‘दार उघड बये दार उघड’
हे तो तिला सांगत नाही. तिचं द्वार सदैव उघडचं असतं. हे दार म्हणजे माझ्या हृदयाचं दार हे जगदंबे माझ्या हृदयाचं दार तू उघड. हा π, हा त्रिविक्रमातून होणारा अनंतत्वापर्यंतचा प्रवास म्हणजेच ‘मी’, ‘स्वत:’ प्रत्येकजण तुमचा जन्म झाला कारण ‘ती’ची इच्छा होती. मी कोण आहे? ‘मी’ तिची इच्छा आहे. (प्रत्येकजण) तिच्या प्रत्येक गुणांचे अवगाहन करुया म्हणून स्वत:ला दुर्बळ, हलकट, नीच, नालायक समजू नका.

॥हरि ॐ॥
Comments
Post a Comment
Hariom